शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

इचलकरंजीला पाणी देताना वारणाकाठालाही न्याय देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:08 IST

तांदुळवाडी : इचलकरंजी शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. परंतु हे पाणी देताना वारणाकाठच्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाणार आहे. अमृत योजनेविषयी शेतकरी आणि इचलकरंजीचे नागरिक यांचा विचार करुन सामंजस्यातून मार्ग काढू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले.वाळवा तालुक्यात शेट्टी यांच्या फंडातून ...

तांदुळवाडी : इचलकरंजी शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. परंतु हे पाणी देताना वारणाकाठच्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाणार आहे. अमृत योजनेविषयी शेतकरी आणि इचलकरंजीचे नागरिक यांचा विचार करुन सामंजस्यातून मार्ग काढू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले.वाळवा तालुक्यात शेट्टी यांच्या फंडातून झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन शनिवारी झाले. यानंतर कणेगाव येथे झालेल्या सभेत शेट्टी बोलत होते. वाळवा पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते राहुल महाडिक अध्यक्षस्थानी होते. जि. प. सदस्य निजाम मुलाणी, स्वाभिमानीचे वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव, महेश पाटील, सयाजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.राहुल महाडिक म्हणाले, जोपर्यंत हातकणंगले लोकसभा मतदार संघात राजू शेट्टी आहेत, तोपर्यंत महाडिक कुटुंब तुमच्या पाठीशीच राहील.यशवंत दूध संघाचे संचालक महेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी एस. यु. संदे, डी. के. पाटील, जगन्नाथ पवार, तानाजी पवार, प्रा. शाहू पाटील, शिवाजी पवार, सी. एम. मोरे, मुरलीधर मांगलेकर, संतोष पाटील, संतोष शेळके, गुंडाभाऊ आवटी, सुदर्शन वाडकर, प्रेम उपाध्ये व कार्यकर्ते उपस्थित होते.शत्रुराष्टÑाकडून साखर आयात कशासाठी?शेट्टी म्हणाले, साखरेचे दर पाडण्यासाठी भाजप सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली आहे. देशात साखरेचे उत्पादन असताना शत्रुराष्ट्राकडून साखर कशासाठी आयात केली? यामुळेच भारतातील साखरेचे भाव गडगडले आहेत. या चुकीच्या निर्णयामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत.