शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

इचलकरंजीला पाणी देताना वारणाकाठालाही न्याय देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:08 IST

तांदुळवाडी : इचलकरंजी शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. परंतु हे पाणी देताना वारणाकाठच्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाणार आहे. अमृत योजनेविषयी शेतकरी आणि इचलकरंजीचे नागरिक यांचा विचार करुन सामंजस्यातून मार्ग काढू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले.वाळवा तालुक्यात शेट्टी यांच्या फंडातून ...

तांदुळवाडी : इचलकरंजी शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. परंतु हे पाणी देताना वारणाकाठच्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाणार आहे. अमृत योजनेविषयी शेतकरी आणि इचलकरंजीचे नागरिक यांचा विचार करुन सामंजस्यातून मार्ग काढू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले.वाळवा तालुक्यात शेट्टी यांच्या फंडातून झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन शनिवारी झाले. यानंतर कणेगाव येथे झालेल्या सभेत शेट्टी बोलत होते. वाळवा पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते राहुल महाडिक अध्यक्षस्थानी होते. जि. प. सदस्य निजाम मुलाणी, स्वाभिमानीचे वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव, महेश पाटील, सयाजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.राहुल महाडिक म्हणाले, जोपर्यंत हातकणंगले लोकसभा मतदार संघात राजू शेट्टी आहेत, तोपर्यंत महाडिक कुटुंब तुमच्या पाठीशीच राहील.यशवंत दूध संघाचे संचालक महेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी एस. यु. संदे, डी. के. पाटील, जगन्नाथ पवार, तानाजी पवार, प्रा. शाहू पाटील, शिवाजी पवार, सी. एम. मोरे, मुरलीधर मांगलेकर, संतोष पाटील, संतोष शेळके, गुंडाभाऊ आवटी, सुदर्शन वाडकर, प्रेम उपाध्ये व कार्यकर्ते उपस्थित होते.शत्रुराष्टÑाकडून साखर आयात कशासाठी?शेट्टी म्हणाले, साखरेचे दर पाडण्यासाठी भाजप सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली आहे. देशात साखरेचे उत्पादन असताना शत्रुराष्ट्राकडून साखर कशासाठी आयात केली? यामुळेच भारतातील साखरेचे भाव गडगडले आहेत. या चुकीच्या निर्णयामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत.